breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसात तक्रार, फसवणूक केल्याचा आरोप
औरंगाबाद : एकीकडे राज्यात शिवसेनेकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना, दुसरीकडे शिवसेना नेत्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत महासेनाआघाडी करुन, सत्तास्थापन्याच्या वाटाघाटी सुरु केल्या आहेत. त्यालाच तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे.
महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार, रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांची नावं आहेत. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.