breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आेबीसी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचा अध्यादेश काढा

आेबीसी जागरण परिषदेत एकमुखी मागणी

पुणे – इतर मागास वर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला कोणत्याही परिस्तितीत धक्का लागणार नाही, असा जीआर राज्य सरकारने काढावा, अशी मागणी ओबीसी जागरण परिषदेत करण्यात आली. तसेच, मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या मागासवर्ग आयोगावरही ओबीसी जागरण परिषदेतून टीका करण्यात आली. मराठा समाज मागास कसा, असा प्रश्नही या परिषदेतून उपस्थित करण्यात आला.

पुण्यातील सावित्रीबाई फुले स्मारकात आज पहिल्या ओबीसी जागरण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘आरक्षण : काल-आज-उद्या’ याविषयावर चर्चा होणार झाली.

आमदार प्रकाश शेडगे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन करण्यात आले. हरिभाऊ राठोड, लक्ष्मण माने, शंकरराव लिंगे, सचिन माळी, श्रावण देवरे यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेला राज्यभरातून ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ओबीसी जागरण परिषदेच्या प्रमुख मागण्या 

  1. व्ही. पी. सिंग यांना ‘भारतरत्न’ द्या
  2. पुणे विद्यापीठाची नामदुरुस्ती करावी
  3. पुणे विद्यापीठाच्या लोगोमधून ‘शनिवारवाडा’ काढून त्यामध्ये ‘भिडे वाडा’ यावा
  4. ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही, असा जीआर सरकारने काढावा
  5. भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button