breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यातील 70 ते 80 लाख लोकांनी अजूनही लसीचा पहिली डोस घेतलेला नाही – राजेश टोपे

मुंबई | प्रतिनिधी 
राज्यातील 70 ते 80 लाख लोकांनी अद्यापही कोरोना लसीचा पहिला दोस घेतलेला नाही. ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची जरी संख्या वाढत असली तर रूग्णालयात भरती होण्याचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मुंबईमध्ये आजच्या घडीला 80 टक्के बेड रिकामे असल्याचे सांगत ते म्हणले की, ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ झालेली नाही. कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील टोपे यांनी यावेळी सांगितले.

टोपे म्हणाले की, देशासह राज्यात कोरोना बाधित होणाऱ्या रूग्णांची संख्या नक्कीच झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, जरी कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी, त्याती अनेकांना अगदी सैम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्याशिवाय ज्याप्रमाणे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड आणि ऑक्सिजनची  मागणी मोठ्या प्रमाणात होती. तशी परिस्थीती नककीच आता नाहीये. ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

राज्यातील कोरोना लसीकरणाच्या  वेग वाढविण्यावर जोर देण्यात असून 10 तारखेनंतर प्रिकोशनरी डोस कशा पद्धतीने देणार, याबाबतची माहिती देखील शरद पवार यांनी घेतली. त्याशिवाय औषध, निर्बंध यावर चर्चा झाली असून याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतली असे टोपे यांनी यावेऴी सांगितले. कौटुंबिक कार्यक्रमांवर कडक नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी असे मत देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button