आमदार व जिल्हाधिकाऱ्यांना करावा लागला बैलगाडीने प्रवास
परभणी | गेल्या काही दिवसांपासून राज्यात होणाऱ्या पावसामुळे (rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आणि पंचनामे प्रशासनाकडून आणि सरकार मधील मंत्र्यांकडून सुरु आहेत. दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्हांना फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने पिकांची चांगलीच नासाडी केली आहे. याची पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे गेले होते. मात्र, ज्या ठिकाणी नुकसानीची पाहणी करण्यासाठी जायचे होते. नेमकं त्याचं पावसामुळे ठिकाणी जायला रस्ता नव्हता. मग काय गावकऱ्यांनी बैलगाडी आणली आणि जिल्हाधिकारी व आमदारांनी चक्क बैलगाडीत बसून प्रवास केला आहे.
पालम तालुक्यात मागच्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टीप्रमाणे पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मागच्या महिनाभरापासून सर्वत्र जोरदार पाऊस बरसतोय. वार्षिक सरासरीच्या जास्त पाऊस परभणी जिल्ह्यात झाला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. जास्तीच्या पावसामुळे शेतकरी देखील मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे गेले. मात्र, ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी जायला रस्ता नव्हता. मग काय गावकऱ्यांनी बैलगाडी बोलली आणि जिल्हाधिकारी आणि आमदारांनी चक्क बैलगाडीत बसून प्रवास केला. त्यांचा हा प्रवास अत्यंत भन्नाट होता.