breaking-newsTOP Newsकोकणताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Uddhav Thackeray। भाजपला सातासमुद्रापार तडीपार करा : उद्धव ठाकरे

रत्नागिरी येथे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी सभा

रत्नागिरी: ”कधी कांद्यांवर निर्यात बंदी, कधी काजू, कधी आंबा; आता तुम्हा या भाजपलाच निर्यात करून सातामुद्रापार तडीपार करून टाका”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला मत म्हणजे विनाशाला मत असा इशारा देखील जनतेला दिला. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कोकणातील बारसू, जैतापूर सारखे विनाशकारी प्रकल्प जमिनीवरूनच नाही तर कागदावरूनही रद्द करून टाकू, असे आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी रत्नागिरी येथे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे गटावर जोरदार टीका केली.

”कोकणात मला प्रचाराची गजर नाही. कोकण हे शिवसेनेचं व ठाकरे कुटुंबाचं हृदय आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही सोबत आहात. शिवसेना फोडली, चोरली, गद्दाराकडे आमच्या पक्षाचं चिन्ह व नाव दिलं. आता भाजपने त्या गद्दाराची तंगडतोड केली. जागा कापल्या. कोकणातली जागा जी इतक्या वर्षापासून शिवसेनेची होती ती आता भाजपकडे गेली आहे. त्या लाचाऱ्यांना कळलंच नाही की गद्दारांचे जे मालक दिल्लीत बसले आहेत. ते शिवसेनेसोबत कोकणाचं नातं तोडायला निघाले आहेत. त्यांना माहित नाही की कोकणात जांभा दगड आहे. कोणे एक काळी हा दगड लाव्हारस होता. त्याचा पुन्हा लाव्हारस होणार नाही असं नाही. आज महाराष्ट्रात भाजपविरोधात लाव्हारस उफाळून वर आलेला आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना, चिन्ह चोरलं. मला इथे बसलेल्या सगळ्यांचा अभिमान आहे. समोर जो उभा आहे. की टोप घालताना खाजवून विचार करावा लागत असेल की आज कोणत्या पक्षात आहोत आपण. आठवतच नाही त्यांना. इतके वर्ष स्वत:सकट स्वत:ची पिलावळी सहीत जिथे सत्ता तिथे तुम्ही झुकता. यांनी एक तरी लघु किंवा सुक्ष्म तुमच्या साईजप्रमाण प्रकल्प कोकणात आणला आहे का. भाजपने यांना त्यांच्या कुवतीप्रमाणेच मंत्रालय दिलं आहे. आता निवडणूकीनंतर हे अतिसूक्ष्म होतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

”आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून आमच्याशी लढायला निघालात. हे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. हे माझं वैभव आहे. ही समोर बसलेली जनता माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. आमची घराणेशाही मंजूर आहे. सभेत शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावता ते चालतं. नालायक लोकं तुम्ही माझा धनुष्यबाण चोरता, पक्ष चोरता. आणि माझ्या वडिलांचा फोटो लावता. तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. कुणाची घराणेशाही तुम्ही पोसताय. कोकण सुसंस्कृत आहे. काल परवाकडे फड़णवीस येऊन गेले की ते म्हणतात आम्हाला मत म्हणजे काँग्रेसला मत. जर कोकणात शिवसेना उभी राहिली नसते. तर आज कोकणता गुंडाराज असता. बारसू मध्ये माता भगिनींना मराहाण केली तेव्हा शिवेसना मध्ये पडली नसती तर हा विषय यांनी संपवला असता. आपलं सरकार आल्यानंतर बारसू जैतापूर मध्यै फौजा उभ्या करू हेच यांच्या डोक्यात आहे. त्यांचा गुंड पद्धतीने यांना कोकण स्वत:च्या विळख्यात घ्यायचा असून तशीच बारसूची रिफायनरिही उभी करतील हे लोक. आमचं सरकार आल्यावर आम्ही कोणताही विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाही. फक्त जमिनीवरच नाही तर कागदावरूही तो प्रकल्प हटवून टाकेन. त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. एका बाजूला विनायक आहे तर दुसऱ्या बाजूला विनाश आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button