breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई
आपला मुख्यमंत्री…आपले नशीब…आपले दुर्दैव : मनसे नेते संदीप देशपांडे
मुंबई । प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मात्र मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही, असा टोला मनसेने उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर लगावला आहे.
वाढीव विजबीलासारखा ऐरणीवर असलेल्या विषयावर मुख्यमंत्री बोलणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोलणे टाळले, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने कालच्या मुख्यमंत्र्याच्या भाषणाने अपेक्षाभंग झाला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.