breaking-newsमुंबई
आत्महत्येची परवानगी द्या!
मुंबई – सरकारने मागील तीन वर्षांत भरतीच काढली नाही. 2016 साली पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सुमारे 700 जागांची भरती काढण्यात आली. यातील 500 हून अधिक जागा खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आल्या होत्या. एनटी, ओबीसीसाठी जागा नसल्याने या विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गात अर्ज केले.
मात्र त्यानंतरही गुणवत्ता यादीत येऊनही डावलण्यात आले असल्याचे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या अजय कराड याने सांगितले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून स्पर्धा परीक्षेसाठी बसणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आम्हाला न्याय द्या नाही तर आत्महत्येची तरी परवानगी द्या, अशी मागणी केली आहे.