breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आचारसंहिता लागू होताच महापौरांनी रिक्षामधून केला प्रवास
पिंपरी, महाईन्यूज, प्रतिनिधी
निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज आचारसंहिता जाहीर केली. त्यावर पिंपरी-चिंचवडचे महापौर राहूल जाधव यांनी आपले शासकीय वाहन जमा करून रिक्षामधून घरी जाणे पसंद केले. हा महापालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान २१ ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली. राज्यातील २८८ मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.