अंतिम वर्षांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्याची
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यात अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, लोकल सेवा बंद असल्याने याचा फटका परीक्षार्थींना बसण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. म्हणजेच, केंद्रीय रेल्वे . विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवत लोकलने प्रवास करु शकणार आहेत.मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सध्या सामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच लोकल धावत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा बंद करण्यात आली असून लोकल सेवा सुरू होण्याची प्रतिक्षा पाहिली जात आहे. त्यातच अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा येऊ घातल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत कसे पोहोचणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु केली जाणार आहेत अशी माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. इतरांनी स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन करताना प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास रेल्वेने सांगितलं आहे.