TOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

विराट-राहुलच्या शतकाचा धमाका, पाकिस्तानसमोर 357 धावांचं लक्ष्य

नवी दिल्ली : आशिया चषक 2023 च्या सुपर 4 चा तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे खेळला जात आहे. आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तान विरुद्ध प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाने विराट कोहली आणि केएल राहुलच्या शतकांच्या जोरावर 50 षटकात 2 गडी गमावून 356 धावा केल्या. केएल राहुल आणि विराट कोहली शतके झळकावून नाबाद परतले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानने 1-1 विकेट घेतली.

भारताकडून विराट कोहलीने नाबाद 122, तर लोकेश राहुलने नाबाद 111 धावा केल्या. शुभमन गिलने 58 तर कर्णधार रोहित शर्माने 56 धावा केल्या. भारताने सोमवारी 24.1 षटकांत 147/2 या कालच्या धावसंख्येच्या पुढे 356 धावा केल्या. भारताने सोमवारी राखीव दिवशी एकही गडी गमावला नाही आणि 25.5 षटकात 209 धावा केल्या.

पावसामुळे (रविवारी) सामना नियोजित वेळेत होऊ शकला नाही आणि आता तो राखीव दिवशी खेळवला जात आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या होत्या आणि आज येथून सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार होता मात्र पावसामुळे तो होऊ शकला नाही. . राखीव दिवशी संध्याकाळी 4.40 वाजता सामना सुरू झाला असून पूर्ण 50-50 षटके खेळवली जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button