breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाला सुरूवात, बळीराजा चिंतेत

पुणे : सध्या तापमानाचा पारा घसरला असून राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. भात आणि द्राक्षाला या अवकाळीचा फटका बसणार आहे. परंतु रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पहाटेपासूनच सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा – वन मॅन आर्मी मॅक्सवेलने ठोकले द्विशतक! ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये 

दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button