Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

विरारचा विचार काय?, विविध पक्षांच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांची घेतली भेट

वसई | राज्यसभा निवडणुकीच्या वेळी राजकीय आखाड्याच्या केंद्रस्थानी विरार होते. आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विरार चर्चेत येऊ लागले आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मते मिळवण्यासाठी मागील तीन दिवसांत तीन नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेतली आहे.

बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळावी, यासाठी विविध नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी १० मते कमी पडत आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व उमेदवार भाई जगताप यांनी मंगळवारी सायंकाळी ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात विरार येथे भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. परंतु ठाकूर आणि जगताप यांनी आमचे जुने संबंध असल्याने ही भेट झाल्याचे सांगितले. या निवडणुकीत मदत करावी असे आवाहन भाई जगताप यांनी केल्याचे ठाकूर यांनी सांगितले. भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांनी बुधवारी ठाकूर यांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूर आणि मनीषा चौधरी यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धा तास बैठक झाली. मात्र मी विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात नाही तर, पालघर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते, असे त्यांनी सांगितले.

निंबाळकरही भेटले

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार रामराजे निंबाळकर हे ठाकूर यांच्या भेटीला गुरुवारी आले होते. एकत्र भोजन केल्यानंतर त्यांच्यात तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चा झाली. विधान परिषद निवडणुकीत आम्हाला मतदान करावे, असे निंबाळकर यांनी म्हटल्याचे ठाकूर यांनी सांगितले. निंबाळकर यांनी मात्र या भेटीचा तपशील उघड करणे टाळले. आम्ही चांगले मित्र असल्याने मी ठाकूर यांची भेट घेतली, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button