Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

आंभे गावाजवळील मलंगगड नदीत पोहताना बुडत असलेल्या एका अनोळखी तरुणाला वाचवताना डोंबिवलीतील दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू

अंबरनाथः अंबरनाथ तालुक्यातील आंभे गावाजवळील मलंगगड नदीत पोहताना बुडत असलेल्या एका अनोळखी तरुणाला वाचवताना डोंबिवलीतील दोन कॉलेज तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. अंकित जैस्वाल (१९) आणि निखिल कनोजिया (१९) अशी दोघांची नावे असून माणुसकी या दोन्ही तरुणांच्या जीवावर बेतली असून उशिरा दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मलंगगड परिसरात आंभे गावाजवळील बंधाऱ्याजवळ सोमवारी दुपारी डोंबिवलीतील एका नामांकित कॉलेजमधील १२ तरुण पिकनिकला आले होते. मात्र यावेळी नदीत पोहत असताना एक अनोळखी तरुण पाण्यात बुडत असल्याचे अंकित आणि निखिल यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्या तरुणाला वाचवण्यासाठी दोघे पाण्यात पुढे गेले. मात्र बुडणारा तरुण वाचला तरी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अंकित व निखिल या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत स्थानिक ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तरुणांचा शोध सुरू केला. तसेच याबाबत हिललाइन पोलिसांना माहिती देण्यात दिली. हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी आपल्या पोलीस सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोन्ही तरुणांचे मृतदेह उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मलंगगड भागात नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कुशिवली आणि खरड गावांत प्रत्येकी एक तर नेवाळी व चिंचवली गावात प्रत्येकी दोघांचा बुडून मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button