breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘सत्य जरा जास्त टोचतं’, भाई जगतापांचा अमृता फडणवीसांना पलटवार

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृत फडणवीस आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळतेय. अमृता फ़डणवीसांनी पलटवार केल्यानंतर आता भाई जगतापांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा :-‘भाई जगताप असा टपोरी ज्याला ‘भाई’ बनायचं होतं पण डरपोक…- निलेश राणे

राज्यात एकीकडे परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर मोठा राजकीय वाद सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगला असताना दुसरीकडे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यामधला वाद वेगळ्याच ट्रॅकवर रंगू लागला आहे. भाई जगताप यांनी “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांची खाती त्यांच्या पत्नी काम करतात त्याच बँकेत कशी वर्ग झाली?” असा सवाल केल्यानंतर अमृता फडणवीस यांनी तिखट शब्दांमध्ये ट्वीट करत भाई जगताप यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच, भाई जगताप यांचा ट्वीटमध्ये एकेरी उल्लेख देखील करण्यात आला होता. त्यावर आता भाई जगताप यांनी खोचक शब्दांमध्ये पलटवार केला आहे. “सत्य जरा जास्त टोचतं”, असं भाई जगताप म्हणाले आहेत.

नेमका काय आहे वाद?

काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना अमृता फडणवीसांचा उल्लेख केला होता. “माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं”, असं भाई जगताप म्हणाले होते. त्यावरून अमृता फडणवीस यांचा चांगलाच तिळपापड झाल्याचं त्यांनी केलेल्या ट्वीटवरून दिसून आलं.

काय होतं अमृता फडणवीस यांचं ट्वीट?

अमृता फडणवीस यांनी ट्वीटमधून भाई जगताप यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही UTI/Axis बँक”ला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचं न्हाय!” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर आता भाई जगताप यांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

“मला त्या ट्वीटला अजिबात महत्त्व द्यायचं नाही. २००५ साली हा निर्णय आमचं सरकार असताना झाला,. १६ बँकांचा त्यात प्रस्ताव होता. २००५ पासून २०१७पर्यंत त्यावर निर्णयच झाला नाही. पण २०१७मध्ये अचानक अशी काय जादू झाली की अ‍ॅक्सिस बँकेकडे खाती वर्ग करण्यात आली? ही गोष्ट खरी आहे की सत्य जरा जास्त टोचतं आणि हे सत्य आहे”, असं भाई जगताप म्हणाले आहेत.

दरम्यान, एकेरी उल्लेखावरून टीका होऊ लागल्यानंतर अमृता फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या ट्वीटमध्ये भाई जगताप यांचा पुन्हा आदरार्थी उल्लेख केल्याचं आढळून आलं आहे!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button