breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘…म्हणून मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे’

मुंबई |

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकांची गाडी व त्यानंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी शिवसेना नेत्यांकडून सातत्याने वाझेंची बाजू घेतली जात होती. आता यावरून भाजपकडून टीका केली जात असून, भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केलेली आहे. अखेर सचिन वाझेंना अटक झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे आहे. “सचिन वाझेंच्या माध्यमातून एनआयएने मनसुख हिरेनची केस घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे. सचिन वाझेंच्या माध्यमातून अजून किती लोकांच्या हत्या केल्या गेल्या याची देखील खात्री एनआयएने केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

वाचा- आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल, शरद पवाराचं भाकीत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button