पायांत चांदीचे पैंजण का घालतात, तर त्यामागे आहे वैज्ञानिक कारण
पायात पैंजण घातल्याने एक्यूप्रेशरचे काही बिंदू दाबले जातात आणि यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पैंजण पायांच्या संपर्कात आल्यावर चांदी त्वचेला घासते आणि शरीरात प्रवेश करते त्यामुळे हाडे मजबूत होतात.
चांदी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय चांदीचे पैंजण घातल्याने पायात कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
हेही वाचा – देशाच्या जडणघडणीत धनगर समाजाचे योगदान!
चांदीचे पैंजण घातल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि पायाला सूज किंवा मुंग्या येण्याच्या समस्या दूर होतात. एवढेच नव्हे तर मासिक पाळीतील वेदना, स्त्रीरोगविषयक विकार, वंध्यत्व आणि हार्मोनल असंतुलन यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
चांदीचे पैंजण घातल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच पोटाशी संबंधित समस्या देखील दूर होतात.
पायातील पैंजणामध्ये निघणारा आवाज सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे मनातील वाईट विचार निघून जातात आणि मन प्रसन्न होते.