breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

नागरिकांनो काळजी घ्या! राज्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार

पुणे | मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यांमधील तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे म्हणूनच नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात उन्हाच्या झळा जाणवत आहे. कमाल तापमान ३८.९ अंशांवर आहे सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही आर्द्रतेचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे तापमानाचा पार चाळीशीपार जाऊ शकतो. तसेच कोकण आणि मुंबईत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हेही वाचा    –    ‘शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा..’; शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपाला इशारा 

पुण्यात तापमानात वाढ होत असल्याने पुणेकरांनी उन्हापासून बचाव करण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. त्यासोबतच महापालिकेनेदेखील खबरदारीचे उपाय सुचवले आहेत. हिट वेव येण्याची शक्यता पाहता पुणे महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. पुणे महानगर पालिकेने उष्माघातापासून वाचण्यासाठी उपाय योजना सुचवल्या आहेत. तसेच बाहेर करतांना काय काळजी घ्यावी याची देखील माहिती दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button