पिंपरी / चिंचवड

रस्त्याचा अंदाज न आल्याने चांदखेड ओढ्यात रिक्षा पडली

– पती, पत्नीचा जागीच मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

समोरून येणा-या वाहनाच्या लाईटच्या प्रकाशात रस्त्याचा अंदाज न आल्याने रिक्षा पुलाच्या कठड्यावरून ओढ्यात पडली. यामध्ये रिक्षातून प्रवास करणा-या पत्नी, पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) मावळ तालुक्यातील चांदखेड ओढ्याच्या पुलावर घडली.

बबन गणपत कदम (वय 70), हौसाबाई बबन कदम (वय 65) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. गोरख बबन कदम (वय 39, रा. कातवडी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आमोल मधुकर कदम (वय 35, रा. कातवडी, ता मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई-वडील मयत हौसाबाई आणि बबन कदम हे आरोपी अमोल कदम याच्या रिक्षातून जात होते. चांदखेड ओढ्याच्या पुलावर आल्यानंतर समोरून आलेल्या वाहनाच्या लाईटच्या प्रकाशात अमोल कदम याला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पुलावरून रिक्षा ओढ्यात पडली. यामध्ये बबन कदम आणि हौसाबाई कदम यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button