लग्नात गिफ्ट म्हणून दिलेल्या दागिन्यांची किंमत वाढल्याने मावशीने 18 वर्षांनी परत मागितले
पुणे | मावशीने मोठ्या हौसेने लग्नामध्ये गिफ्ट म्हणून दिलेले दागिने तब्बल आठ वर्षांनी परत मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. आणि याच वादातून एका महिलेला बेदम मारहाण करत तिचा विनयभंग करण्यात आला. पुण्यातील नाना पेठेत दोन दिवसापूर्वी हा प्रकार. समर्थ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत नंतर तिची मावशी आणि इतर तीन नातेवाईकांविरोधात विनयभंग, मारहाण व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, अठरा वर्षांपूर्वी फिर्यादीचे लग्न झाले होते. यावेळी लग्नात मावशीने हौसेने फिर्यादीला दोन सोन्याच्या बांगड्या त्यावेळी या बांगड्यांची किंमत सहा हजार रुपये होती. परंतु सध्याच्या भावानुसार याच बांगड्याची किंमत 30 हजार रुपये इतकी झाली. किंमत वाढल्यामुळेच या बांगड्या मावशीने परत मागितल्या असल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी, मावशी आणि इतर नातेवाईकांमध्ये वाद झाला. त्यातूनच मावशी आणि इतर नातेवाईकांनी फिर्यादी व तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. तर अन्य एका नातेवाईकाने फिर्यादीचा टॉप फाडून विनयभंग केला. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.