breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात पुन्हा पावसाचे थैमान; हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी
राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीटीसह पाऊस बरसला आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता राज्यात पुन्हा हवामाखात्याने यलो अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्याना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात गारपिठ आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. राजस्थान आणि उत्तर गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या पोषक हवामान स्थितीमुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे.