शिंदेंच टेन्शन वाढणार! १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नरहरी झिरवळच घेणार?
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येणार असल्याचं सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महत्वाचे भाष्य केलं आहे.
नरहरी झिरवाळ म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असणाऱ्या १६ आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय मी घेतला होता. कायद्याच्या, संविधानाच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालय देखील हाच निर्णय कायम करेल.
हेही वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख ठरली
दरम्यान, Artical १८० नुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सोपवले असं विधान राहुल नार्वेकर यांनी केलं होतं. त्याबद्दल विचारल असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, या आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय मी घेतला होता, त्यामुळे सुप्रीम कर्टोकडून माझ्याकडेच हे प्रकरण सोपवले जाईल, असंही नरहरी झिरवाळ म्हणाले.