ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘त्या’ वादग्रस्त व्यक्तव्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिकिया, “मला क्षमा मागण्यात गैर वाटत नाही…’

मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सुषमा अंधारे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. मात्र सुषमा अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याबद्दल वारकरी सांप्रदायाचे भावना दुखावल्या आहेत. मात्र, आता सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येत असून, गुन्हा दाखल करण्यात करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, आपण केलेल्या या व्यक्तव्यावर आता स्वतः सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिल्याचं दिसून येत आहे. “माझे जुने व्हिडीओ व्हायरल केले जातात, मग हे लोक मधले 10 ते 15 वर्ष हे कुठे गेले होते?’ असा सवाल त्यांनी केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, ‘शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर मी अशी वक्तव्ये करत नाही.

आधी मी भाष्य केलं असलं तरीही त्यामागील लॉजिक समजून घेतलं पाहिजे. माझ्यासाठी माझा पक्ष महत्त्वाचा आहे. मला पक्षासाठी काम करायचं असेल तर मी कुठूनही करू शकते. मात्र, माझ्या बोलण्याने वारकरी संत संप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागण्यात गैर वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली होती.

सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यावर तुषार भोसले यांनी टीका….
“आमच्या हिंदू देवी-देवतांवर आणि संत परंपरेवर टीका करणाऱ्यांना पक्ष भाड्याने चालवायला दिला की काय परिणाम होतो, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. देवी-देवतांचा आणि संतांचा अपमान करणारे आज पक्षाचे प्रवक्ते म्हणून राज्यभर भटकत आहेत. तसेच, आमच्या देवी-देवतांवर गरळ ओकत आहेत,” असे तुषार भोसलेंनी म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button