breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

११ ते १३ मे दरम्यान फडणवीसांना धक्का बसणार? सुषमा अंधारेंचा मोठा दावा

देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट सक्रिय

मुंबई : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचार रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की पुन्हा येतो असं म्हटलं. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे अचानक राज्यपालांना भेटायला जाणं, गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणं किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावणं, आतापर्यंत कधीही पाहिलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांची रजा घेतली. या तीन दिवसांमध्ये सलग पूजा होती म्हणे… पूजा वगैरे कशासाठी होत आहेत, याचा अर्थ लावा..पण, ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेलं असेल.

देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत आहेत, त्यासाठी आटापिटा करत आहेत पण फडणवीसांच्या उठाठेवींमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. देवेंद्र फडणवीस एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आले आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुन्हा येतील पण विरोधी नेते म्हणून, असं सुषमा अधारे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button