breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शरद पवारांना भाजपसोबत जायचं नव्हतं, भुजबळांची कबुली’; सुप्रिया सुळेंचा पलटवार

मुंबई : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे दावे फेटाळले आहेत. शरद पवारांना भाजपसोबत जायचं नव्हतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, छगन भुजबळ यांनी पहाटेचा शपथविधी आणि आता झालेला 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत. हे छगन भुजबळ यांनी स्वत:च कबूल केलं आहे. शरद पवारसाहेबांना अंधारात शपथ घेतली गेली. हे कालच्या मुलाखतीतून समोर आलं आहे.

शरद पवार आणि भाजपची एकत्र येण्याची चर्चा झाली. मात्र नंतर शरद पवार यांनी माघार घेतली, असं भुजबळ म्हणाले. त्यावर विचारधारा वगैरे काही असतं की नाही? आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आम्ही जनतेसाठी काम करतो. शरद पवार साहेबांनी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलं नाही. काँग्रेसचा विचार सोडणार नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – ‘पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं’; छगन भुजबळ यांचं विधान

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

छगन भुजबळ यांनी काल एका मुलखतीत २०१९ आणि २०२३ च्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर भाष्य केलंय. २०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. मंत्रिपदापासून खाते वाटपापर्यंतची सगळ्यावर बोलणी झाली होती. शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजपने शरद पवार यांना विचारलं आमच्यासोबत नक्की राहणार का? तेव्हा शरद पवार यांनी त्यांनी होकार दिला होता. पण नंतर पवारांनी माघार घेतली. पण अजितदादांनी शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला. म्हणून ते भाजपसोबत गेले. त्यांनी पहाटेची शपथ घेतली, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button