राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नाला यश, इयत्ता पहिली ते पीजीपर्यंतच्या शूल्कात सवलत ?
पिंपरी / महाईन्यूज
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून मागील 15 दिवसापासून एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पहिली पासून ते PG पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देऊन त्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. या लढ्याला पहिले प्राथमिक यश आले आहे.
पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फि बाबत काही तक्रार असल्यास अपील करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या विभागांत विभागीय शुल्क नियामक समिती गठीत करण्याची अधिसूचना काल महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे हे प्राथमिक यश आहे. आपल्याला अजून पुढे जायचे आहे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच वर्गांच्या आणि शाखांच्या विद्यार्थ्यांना फी मध्ये दिलासा मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष विनोद भांगे यांनी दिली.
हा लढा पूर्णतः यशस्वी करण्यासाठी अजून सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. या प्रयत्नात समाजाचा भाग म्हणून समाजातील सर्वच वर्गाने (विद्यार्थी, पालक, नागरिक, सरकारी संस्था, सरकारी यंत्रणा) यांनी सहभागी होत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागे उभे राहावे, सहकार्य करावे, असे आवाहन भांगे यांनी केले आहे.