Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणमार्गे मंगळुरू जाण्यासाठी सहा अतिरिक्त रेल्वेगाड्या

मुंबई: गणेशोत्सवासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणमार्गे मंगळुरू जाण्यासाठी सहा अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडण्याचा मध्य रेल्वेने निर्णय घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू (गाडी क्र. ०११७३) ही गाडी २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी धावणार आहे. एलटीटीहून ती रात्री ८.५० वाजता सुटेल आणि मंगळुरू येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता पोहोचेल. या गाडीचा परतीचा प्रवास (०११७४) २५ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबरला होणार आहे. विशेष गाडी क्र. ०११७३चे विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले करण्यात आले आहे.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने यापूर्वीच २१२ गणेशोत्सव विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली. या गाड्यांसह यावर्षी एकूण गणेशोत्सव विशेष गाड्यांची संख्या २१८ होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button