“कसबा निवडणूक बिनविरोध होऊ शकते”; शौलेश टिळक यांचे विधान
कसबा मतदारसंघातील भाजपचे पाच जण इच्छुक
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी मागणी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज वाडेश्वर काट्याचे आयोजन करण्यात आले. या वाडेश्वर काट्यावर मुक्ता टिळक यांचे पती शौलेश टिळक उपस्थित होते. त्यावेळी कसबा निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असं विधान केलं.
मुक्ता टिळक यांचा नगरसेवक ते आमदारपर्यंत प्रवास शहरातील नागरिकांना माहिती आहे. तसेच त्यांच्या राजकीय प्रवासात प्रत्येक व्यक्तीसोबत चांगला संवाद होता. त्याचबरोबर आता पोटनिवडणुकीमुळे सर्व पक्षांतील नेते इच्छुक असल्याचे समजत आहे. पण आज देखील वाटते की, आपली एक राजकीय संस्कृती आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर पोटनिवडणुकीत त्यांचाच कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी मिळाल्यास ती निवडणूक बिनविरोध होते. मी देखील या निवडणुकी करीता इच्छुक आहे. त्याबाबत पक्ष नेतृत्वाकडून निर्णय घेतला जाईल की, कोणाला उमेदवारी देण्यात येईल.? पण, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि बिनविरोधच होऊ शकते, असं वक्तव्य दिवंगत मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी केलं आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपमधील पाच जण इच्छुक
कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असं सांगितले. मात्र भाजपामधीलच पाच जण इच्छुक आहेत. त्यावरून भाजपमधील नेत्यांमध्ये सहानुभूती दिसत नाही. आम्ही निवडणुकीसाठी असून आमच्याकडून मी शहर प्रमुख संजय मोरे आणि अन्य दोघे जण इच्छुक असल्याचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले.