राज्यात मध्यवधी निवडणुका लागू शकतात? ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर शरद पवाराची सूचक प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंनी कश्याच्या आधारे हे वक्तव्य केलं..
मुंबई : कसब्यात काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी यांना आपल्याला विजय करावंच लागेल. माझा अंदाज आहे की विधानसभेची मध्यावधी निवडणूक लागेल, लागू शकेल. कारण अपात्रतेच्या मुद्यावर सर्वेच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. ते जर उडाले तर आपल्या राज्यात मध्यवर्ती निवडणूका लागू शकतात, असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं. यावरून आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरेंनी कश्याच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे, असं वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरील निकाल अजून आलेला नाही. सुनावणीत पहिले तीन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर आता २८ फेब्रुवारीपासून शिंदे गटाचे वकील बाजू मांडतील. मात्र, जर सर्वोच्च न्यायालयाचा नर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि आमदार अपात्र ठरले तर राज्यात राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेला बदलेल? याबाबत चर्चा चालू आहे, असं उद्धव ठाकरे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून म्हणाले.