breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“पूर्वी लोक राऊतांना ऐकायचे, आता बंद करतात”; शंभूराज देसाई

पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री दखल घेतील

सांगली : शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत सकाळी मुलाखत घेतात, त्यावेळी किती जण टीव्ही बघतात याचा माध्यमांनी एकदा सर्वे करावा. मी अनुभव घेतला आहे. पूर्वी लोक राऊतांना ऐकायचे, आता बंद करतात. त्यामुळे त्यांची दखल सुद्ध घ्यायची गरज नाही, अशी टीका राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.

पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांचा अपघात झाला का खून झाला? हा खून कोणी केला, या सगळ्या गोष्टी चौकशीअंती बाहेर येतील, असंही शंभूराज देसाई म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button