breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतांनी आग लावली’

कोल्हापूर : भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर गंभीर टीका केली आहे. ‘संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे, त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावली. पण आता राऊतांची मजल थेट छत्रपतींचं घर फोडण्यापर्यंत गेली’ अशी गंभीर टीका नितेश राणेंनी केली आहे. खरंतर, शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून नितेश राणेंनी टीका केली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडणं लावण्यामध्ये ज्या लोकांचा हात होता. त्यामध्ये राऊतांचाही समावेश आहे. संजय राऊतांचा घर फोडण्याचा इतिहास आहे. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा राऊतांची गाडी फोडण्यात आली होती. त्यावेळी असं का झालं कारण राऊतांनीच दोन्ही भावांमध्ये भांडणं लावली’ अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. पुढे बोलताना निलेश राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला. ‘असंख्य वेळा बाळासाहेब ठाकरेंनी याचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला, की आमच्या घरामध्ये आग लावली जात आहे’ असंही टीका करताना नितेश राणे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button