breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मराठा आरक्षणावरून दिवाळीआधी राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न’; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत उद्या संपत आहे. तरी अद्याप राज्य सरकार आरक्षणचा प्रश्न सोडवू शकलेलं नाही. दरम्यान, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती. त्यानंतर ते महाराष्ट्रभर जनजागृतीसाठी फिरत आहेत. दुसऱ्या बाजूला या एका महिन्यात तीन मराठा तरूणांनी आत्महत्या केली आहे. पण सरकार काय करतंय? सरकारने एक महिन्यात काय केलं? एक महिन्याचा वेळ घेतला होता आता ती मुदत संपली आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातील कुठलंही वर्तमानपत्र घ्या. प्रत्येक वर्तमानपत्रात शिंदे सरकारची जाहिरात आहे. या पानभर जाहिरातीत त्यांनी म्हटलं आहे की आम्ही आरक्षण देतोय. आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देतोय. परंतु, त्यासाठी तुम्हाला आणखी किती वेळ पाहिजे?

हेही वाचा – नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी करतात कन्या पूजन; पाहा मुहूर्त..

तुमच्या मंत्रिमंडळात आणि पक्षांमध्ये काही नेते आहेत जे राज्यातलं वातावरण बिघडवत आहेत. हे लोक दिवाळीआधी राज्यात दंगली घडवण्याच्या प्रयत्नात आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ काहीतरी बोलतात, तर शिंदे गटातील नेत्यांची वेगळी मतं आहेत. शिंदे गटात काही नेते आहेत, जे स्वतःला मराठा समजतात, ही मंडळी मनोज जरांगे पाटलांविरोधात लोकांना भडकवणारी भाषणं देत आहेत. आम्ही मराठे आहोत, आम्ही कुणबी जातप्रमाणपत्र घेणार नाही. अशी वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

ज्यांना गरज आहे, जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी केली जात आहे. परंतु, जे स्वतःला मोठे मराठा मानतात, ज्यांच्याकडे सर्वकाही आहे, आलिशान गाड्या बंगले आहेत त्या मराठ्यांनी कुणबी जातप्रमाणपत्रास विरोध केला आहे. दुसरीकडे, छगन भुजबळ वेगळंच काहीतरी बोलत आहेत. त्यामुळे गोंधळ वाढला आहे. अजित पवार तर लोकांना, पत्रकारांना घाबरत आहेत. प्रश्न विचारल्यावर ते पळून जातात. राज्यात लोक आत्महत्या करू लागले आहेत, हे सगळं कधीपर्यंत चालणार? हे राज्य सरकार आणखी किती लोकांचा बळी घेणार आहे? असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button