breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

“शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा राज्याच्या कारणावर काहीही फरक पडणार नाही”; रामदास आठवले

आंबेडकरी अनुयायांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कोणताही अस्वस्थता नाही

सातारा : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीशी आज युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे राज्याच्या आणि मुंबईच्या राजकारणावर काहीही फरक पडणार नाही. कोणी कोणाबरोबर युती करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते दोघे एकत्र आले म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले असे म्हणता येणार नाही.

यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती महायुतीत भाजपसोबत एकत्र आलेले आहेत आणि त्यावेळी आम्ही भरपूर जागाही जिंकलेलो आहोत. त्यामुळे त्याचा परिणाम यापूर्वी समोर दिसून आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युतीचा काहीही राज्याच्या कारणावर काही फरक पडणार नाही, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी झाली आहे. त्यामुले ते पर्याय शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी वंचितशी युती केली आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती पूर्वीपासून कार्यरत आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या कोणत्याही युतीचा शिवशक्ती भीमशक्ती युतीवर कोणताही परिणाम होणार नाही. आंबेडकरी अनुयायांमध्ये भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे कोणताही अस्वस्थता नाही. या अस्वस्थचेचा परिणाम आमच्या पक्षावर होणार नाही. आमचा पक्ष ज्या बाजूला असेल त्या बाजूला सत्ता असते हे अनेक वर्षाचे गणित आहे, असंही आठवले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button