breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘..तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती’; रामदास आठवलेंचा ठाकरेंना टोला

भारत जोडण्याची गांधींना गरज नाही, कारण बाबासाहेबांनी केव्हाच भारत जोडलेला आहे

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भाजपसोबत युती केली असती तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती, असा टोला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल शिंदे गटाच्या बाजूने आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले ते लोकशाहीचा आदर करणारं आहे. यात लोकशाहीचा कुठेही अपमान नाही. बहुमताने एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आणि खासदार आहेत. उद्धव ठाकरेकडे अगदी कमी मेजॉरिटी असल्यामुळे, निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. त्याच वेळेस जर भाजपच युतीसोबत केले असती तर उद्धव ठाकरे वर ही वेळ आली नसती, असं रामदास आठवले यावेळी म्हणाले.

त्यानंतर पत्रकारशी संवाद साधताना राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. भारत जोडण्याची राहुल गांधींना गरज नाही. सत्तर वर्षे सत्ता असताना तुम्ही भारत जोडला नाही असं म्हणायचं का आणि बाबासाहेबांनी केव्हाच भारत जोडलेला आहे. सबका साथ सबका विकास म्हणून नरेंद्र मोदी यांनी भारत मजबूत केलेला आहे. त्यामुळे तुम्ही काँग्रेस जोडा राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button