breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात पुढील आठवडाभर पावसाची उसंत

मुंबई – गेल्या आठवडाभर गडगडाटासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने शनिवारपासून थोडी उसंत घेतली आहे. यामुळे पुन्हा एकदा उकाडा वाढला आहे. राज्याच्या अनेक भागांत पुढील आठवडाभर अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

मोसमी वारे सक्रीय असले तरी सहारा भागातून येणाऱ्या धूलिकणांमुळे सध्या ढगांच्या निर्मितीला पोषक स्थिती नसल्याने राज्यातील पाऊस गायब झाल्याचा अंदाज हवामान खात्यान वर्तविला आहे. राज्यात पुढचा आठवडाभर पाऊस पडणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. परिणामी यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला असा आनंद व्यक्त केला जात असताना आता अनेक भाग कोरडेच राहणार आहे. दरम्यान, अनेक भागांत पूर्वमोसमी आणि मोसमी पाऊस झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button