breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार-गौतम आदाणी भेटीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; म्हणाले..

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने उद्योजक गौतम अदाणींचा उल्लेख केला जात आहे. गौतम अदाणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठिशी घालत असल्याचा आरोप काँग्रसकडून केला जात आहे. तर इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गौतम अदानी यांची भेट घेतात. त्यावर राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

राहुल गांधी म्हणाले, अदाणी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करतात. तो कोळसा भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट झालेली असते’. या माध्यमातून त्यांनी सामान्य गरीब भारतीयांच्या खिशातून जवळपास १२ हजार कोटी रुपये उकळले आहेत. आपल्याकडे विजेचे दर वाढत जातात. अदाणी किंमती वाढवतात, गरीबांच्या खिशांमधून ते पैसा काढत आहेत. ही बातमी कोणतंही सरकार कोसळवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याला वारंवार वाचवत आहेत, अशा माणसाकडून ही थेट चोरी आहे.

हेही वाचा – ‘एकाच नावाने अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष बाहेर’; राज ठाकरे यांचं विधान 

गौतम अदाणींची शरद पवार वारवार भेट घेतात त्यांना असे प्रश्न का करत नाही? असा सवाल राहुल गांधी यांना केला. यावर राहुल गांधी म्हणाले, मी शरद पवारांना याबाबत कधीही प्रश्न केलेला नाही. शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीयेत. शरद पवार गौतम आदाणींना पाठिशी घालत नाहीयेत. पंतप्रधान मोदी अदाणींना पाठिशी घालत आहेत. त्यामुळेच मी हा प्रश्न मोदींना विचारत आहे. जर शरद पवार देशाचे पंतप्रधान असते आणि ते गौतम अदाणींना पाठिशी घालत असते, तर मी हा प्रश्न शरद पवरांना केला असता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button