संसदेत धुडगूस आणि गदारोळ करणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडे बोल!
नवी दिल्ली | अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत धुडगूस आणि गदारोळ करणाऱ्या खासदारांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच विरोधकांनी मागच्या दहा वर्षांमधून धडा घ्यावा आणि आता तरी हल्कल्लोळ आणि गोंधळ घालू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. तसंच गुरूवारी निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प पटलावर ठेवतील. नारीशक्तीच्या साक्षात्काराचं हे पर्व आहे. मी आशा करतो की मागच्या दहा वर्षात ज्यांना ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने संसदेत प्रत्येकाने कार्य केलं. आज मी हे सांगू इच्छितो की ज्यांना दंगा घालण्याची सवयच झाली आहे, जे धुडगूस घालून लोकशाही मूल्यांचं वस्त्रहरण करतात अशा खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्म परिक्षण करावं.
हेही वाचा – मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ, ‘या’ तारखेपर्यंत होणार सर्वेक्षण!
#WATCH | Budget Session | PM Narendra Modi says, "…At the end of the first session that was convened in this new Parliament building, the Parliament took a graceful decision – Nari Shakti Vandan Adhiniyam. After that, on 26th Jan we saw how the country experienced the… pic.twitter.com/Oa84GNftCX
— ANI (@ANI) January 31, 2024
विरोधाचा स्वर तिखट असला, आमच्यावर कितीही टीका झाली तरीही विरोधकांनी जर चांगले आणि योग्य मुद्दे मांडले तर, आपल्या बोलण्यातून ज्यांनी चांगले विचार ठेवले त्यांना लोक स्मरणात ठेवतात. आमच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया दिली असेल तरीही देशातला एक मोठा वर्ग लोकशाहीच्या या मार्गाने केलेल्या टीकेचंही स्वागत करतो. मात्र ज्यांनी लोकशाहीची मूल्यं बाजूला सारणं, तसंच गोंधळ घालणं ज्यांचा स्वभाव आहे त्यांनी माफी मागण्याची वेळ आली आहे. तसंच गोंधळ घालणाऱ्या खासदारांनी जरा आत्मपरीक्षण करावं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की निवडणूक जवळ आली असेल तर पूर्ण बजेट सादर होत नाही. फक्त अंतरिम बजेट सादर होतं. आम्हीही ती परंपरा कायम ठेवू असंही मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे. जनतेच्या आशीर्वादाने तो आणखी उंचावेल असा मला विश्वास आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.