breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदींना अटक झाली पाहिजे’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांच्यावर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली गेली पाहिजे, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यांच्या या विधानाची चर्चा जोरदार सुरू आहे.

नागपूरमध्ये मोहन भागवत यांनी जी शस्त्रपूजा केली त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, रावण दहनाला माझा सुरुवातीपासून विरोध आहे. आज काही नवीन नाही. आज आनंदाचा दिवस आहे मी कुठलंही वाईट स्टेटमेंट देणार नाही. आजचा दिवस आनंदाने साजरा झाला पाहिजे. जे काही बोलायचं ते उद्या बोलू.

हेही वाचा – ‘काही दिवसांनी हे काळ्या टोप्या घालून फिरतील’; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका 

मोहन भागवत जी काही शस्त्र पूजा करतात ती फक्त या देशाच्या काही जवानांना मिळत असतात. इतरांना नाही. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांना आर्म अॅक्ट खाली अटक झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button