‘माझ्याकडे मराठा आरक्षणावर उपाय पण या सरकारला..’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काहि महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. यावरून, प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. अशी आंदोलनं झाली पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपायही आहे मात्र मी तो उपाय नव्या राज्यकर्त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना सांगणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. अशी आंदोलनं झाली पाहिजेत. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपायही आहे मात्र मी तो उपाय नव्या राज्यकर्त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना सांगणार नाही. मात्र मी तो नव्या सत्ताधाऱ्यांना सांगेन. आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळायचा ते मी सांगेन. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते कसं द्यायचं हे मी नव्या सरकारला जरुर सांगेन मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांना सांगणार नाही. या राज्यकर्त्यांना सांगितलं तर ते त्याचं खोबरं करतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात यशस्वी किल्ला लढवला होता. त्या कुंभकोणी यांना मराठा आरक्षणाच्या केसमध्ये नियमित का केलं नाही? लक्ष देऊ नका, हजर राहू नका असं त्यांना का सांगण्यात आलं? याचं उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावं. महाजन यांनी उत्तर दिल्यास ते टिकणारं आणि सरसकट आरक्षण मराठा समाजाला देतील, असं मानता येईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन म्हणजे लोकशाहीतील तामाशा आहे. अधिवेशन सुरू आहे असं वाटतच नाही. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. जे सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत आणि जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत. त्यामुळे मी याला लोकशाहीचा तमाशा असं म्हणतो, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.