Uncategorized

लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या दाराशी जाऊन पोहोचले पाहिजे

 वर्धा: आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्राजक्त तनपुरे यांनी सेलू तालुक्यातील सालई (कला) येथे आदिवासी पाड्यावर भेट दिली.  प्राथमिक आरोग्य केंद्रावर आदिवासी बांधवांचे दैवत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन  कार्यक्रमाच्या सुरवात झाली. या वेळी त्यांनी आदिवासी  बंधू-भगिनींशी संवाद साधला. तसेच आदिवासी विकास प्रकल्प, वर्धा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या काही योजनांमार्फत येथील लाभार्थ्यांना धनादेश वाटप केले.

 

या वेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले चार भिंतीत बैठका होत राहतील मात्र लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे असेल तर त्यांच्या दाराशी जाऊन पोहोचले पाहिजे या मताचा मी आहे. म्हणूनच मागच्या दौऱ्यात मी वानरविहिरा या पाड्यावर आवर्जून उपस्थित राहिलो. शासनाच्या योजना फक्त कागदावर नाही तर प्रत्यक्षात उतरायला हव्यात. एकही लाभार्थी वंचित राहू नये हा प्रयत्न आहे. यावेळी मी लोकांची त्यांनी निवेदनेही स्वीकारली आणि अधिकाऱ्यांना या विषयांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या

 

तसेच यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी परिसरात वृक्षारोपणही केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button