बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात
भाजपाच्या चित्रा वाघ यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांश याचावरही त्यांनी टीका केली. मात्र उद्धव ठाकरेंच्या दीड वर्षाच्या बाळावरील टीकेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.
बुधवारी झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांश याचावरही त्यांनी टीका केली. मात्र उद्धव ठाकरेंच्या दीड वर्षाच्या बाळावरील टीकेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. अशातच आता चित्रा वाघ यांनी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. ‘पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात’, असे चित्रा वाघ यांनी म्हटले शिवाय, ‘शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात’, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
शिवाजी पार्क येथे झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर बोचरी टीका केली. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांवर केली. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
“शिवसैनिक सोडून स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद…मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून स्वतःकडेच पक्षाध्यक्षपद…शिवसैनिक सोडून मुलासाठी मंत्रिपद…एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच संपादकपद…पदे वाटताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
“पदे वाटताना माझे कुटुंब माझी जबाबदारी पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. हे करत असताना त्याच्या आईच्या मनाची जराही कल्पना केली नाही की तिला काय वाटलं असेल. शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवलं, तुम्ही तर तेही विसरलात. राजकारण इतक्या खालच्या स्तरावर याआधी कधीही गेलं नव्हतं आणि ज्यांनी नेलं त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.