breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘जितेंद्र आव्हाड भांबावले आहेत, ते पागलासारखे..’; काँग्रेस नेत्याची खोचक टीका

मुंबई : हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील विरोधी पक्ष काँग्रेसला विकस निधीच्या स्वरूपात श्रीखंडपुरी मिळाली असल्याचा आरोप केला. यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडोट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड भांबावले आहेत, ते पागलासारखे झाले आहेत. आम्ही काही कोणाच्या दालनात जावून पैसे मागितले नाहीत. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना निधी मिळाला. कमी अधिक निधी सर्वांनाच मिळाला आहे. आम्हाला निधी मिळाला तसाच निधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही मिळाला. त्यांना आव्हाड काहीच बोलले नाही. राजेश टोपे यांनाही निधी मिळाला. तेव्हा आव्हाड यांनी आपल्या माणसांना बोलायला पाहिजे.

हेही वाचा  – Sakshi Malik : ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकने कुस्ती सोडली! 

आमच्यावरच टीका का करता. राष्ट्रवादीच्या आमदारांनी निधीसाठी प्रस्ताव पाठविला तसा आम्हीदेखील पाठविला होता. पूर्वीही असेच व्हायचे. आव्हाडांच्या डोक्यात काय घुसले आहे हे आम्हाला माहिती नाही. जितेंद्र आव्हाड व मुख्यमंत्री शिंदे यांचे मतदारसंघ लागून आहेत. त्यांचे आपसात काय आहे आम्हाला माहिती नाही. त्यांनी हा राग शिंदे यांच्यावर काढावा, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button