breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणविदर्भ

पवार-गडकरी एकाच मंचावर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, फडणवीस मात्र दूर!

नागपूर |

तीस वर्षांपेक्षाही अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलपूजनाला मुहूर्त मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे मंगळवार, ३ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( nitin gadkari ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( sharad pawar ) एकाच मंचावर दिसणार आहेत. विविध मुद्द्यांवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते एकमेकांवर वैयक्तिक टीका करत असातना हे दोन दिग्गज नेते एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारने गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्यानंतर त्याचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत करण्यात आला. हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र अणि राज्य सरकारनेही भरपूर निधी दिला आहे. मात्र, तरीही या प्रकल्पाच्या जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा दूर आहेत. फडणवीस सरकारच्या काळातील ५ वर्षांचा अपवाद वगळता १९९९पासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा खाते आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसची छाप दिसून येत आहे. या कार्यक्रमाला पवार आणि गडकरी यांच्याव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, विभागातील मंत्री व खासदार, आमदार प्रामुख्याने उपस्थित राहतील.

विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते आणि मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी गेल्या दीड वर्षात केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन प्रकल्पाच्या कामाला गती दिली. पुनर्वसनाचा प्रश्नही सोडवण्यात आला. या वर्षाच्या प्रारंभी, ९ जानेवारी रोजी गोसेखुर्द धरणाने अत्युच्च म्हणजे ४० अब्ज घनफूट पातळी गाठली. त्यापूर्वी २००८ साली ३३ अब्जघनफूट पाणी साठवण्यात आले होते. सुमारे ७ अब्जघन फूट पाणी वाहून जात होते. आता त्याचा साठ करण्यात महामंडळाला यश आले आहे.

आणखी चार हजार कोटी हवे

गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आणखी सुमारे चार हजार कोटी रुपयांची गरज आहे. सध्या गोसेखुर्दच्या पाण्यामुळे सव्वा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. सरकारने निधी दिल्यास पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन अडीच लाख हेक्टर सिंचन क्षमता साध्य होईल, असा विश्वास महामंडळाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button