breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

Asia Cup 2023 :…तर पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये; भारतीय संघाचं काय होणार?

Asia Cup 2023 : क्रिकेटप्रेमींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. येत्या रविवारी म्हणजेच १० सप्टेंबरला भारतीय संघाचा सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. मात्र भारत पाकिस्तान सामन्यात पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कोलंबोत पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. त्यामुळे हा सामना रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानने बांग्लादेशविरोधात सुपर-४ फेरीतील पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. अजूनही पाकिस्तानचे दोन सामने बाकी असून त्यांना भारत आणि श्रीलंकेसोबत खेळायचे आहे. पण हे दोन्ही सामने रद्द झाल्यास पाकिस्तान डायरेक्ट फायनलमध्ये पोहचेल कारण त्यांना या दोन्ही सामन्यात १-१ गुण मिळेल, म्हणजेच ४ गुणांच्या जोरावर ते फायनलमध्ये प्रवेश करतील.

हेही वाचा – गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्साहात

दुसरीकडे पहिला सामना गमावल्यानंतर बांग्लादेशच्या खात्यात एकही गुण जमा झाला नाही. उलट त्यांचा नेट रनरेट खूपच कमी झाला आहे. त्यामुळे उर्वरित सामने रद्द झाल्यावर बांग्लादेशचे आशिया कप २०२३ मधील आव्हान संपुष्टात येईल. तर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना फायनलमध्ये पोहचण्याची संधी असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button