‘..तेव्हा राजकारणात आपोआप बदल होईल’; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टव्यक्त पणासाठी प्रसिद्ध आहे. राजकीय उलथापालथ झाली की बऱ्याचदा सर्वसामान्य मतदाराला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे आमच्या मताला किंमत आहे की नाही? याबाबत नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे.
नितीन गडकरी म्हणाले की, या देशात विचारभिन्नता हा प्रॉब्लेम नाही, तर विचारशून्यता हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचा विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुमच्या विचारांशी तुम्ही प्रमाणिक राहायला पाहिजे. तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात.
हेही वाचा – भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्ते पदी अजित अगरकर, BCCI ची घोषणा
तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलगा शोधताना किती विचार करता. मुलगा कसा असला पाहिजे, मुलीची सासू कशी असली पाहिजे, त्याचे आई-वडील कसे असले पाहिजे, घर कसं असलं पाहिजे? मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाहीत? तुम्ही म्हणता हा माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला मत देतो, हा माझ्या भाषेचा आहे म्हणून मत देतो. ज्या दिवशी जनता हे ठरवेल की आम्ही देणारं मत विचारपूर्वक देऊ, आम्ही चुकीच्या माणसाला आमचं मत देणार नाही, त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील, असं नितीन गडकरी म्हणाले.