महाविकास आघाडीत बिघाडी? नाना पटोलेंचं सूचक विधान; म्हणाले..
ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री
मुंबई : आगामी २०२४ च्या निवडणुकीत आघाडी म्हणून लढू कू नाही हे आत्ताच कसं सांगू? असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी म्हटलं होतं. पवरांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघीडीत बिगाडी असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? याची चर्चा सुरू आहे.
नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा आमचा मानस आहे. पण आघाडी नाही झाली तर आमचे सर्व प्लॅन तयार आहेत, असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत. यावर नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री जनता ठरवते. आम्ही त्यावर भाष्य करणं योग्य नाही. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. आज निवडणुका नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर चर्चा करण्याचं कारण नाही. जेव्हा निवडणुका येतील तेव्हा चर्चा होईल. ज्या पक्षाचे आमदार सर्वाधिक निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल.
महाराष्ट्रात चुकून लोकांनी भाजपला १०५ आमदार दिले. महाराष्ट्रात कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार निवडून देणं जनतेची चूक होती. संख्या बळाच्या आधारावर प्यादे चालवण्याचं काम भाजप करत आहे. मात्र हे अधिक काळ चालणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले.