breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठा समजाला पुन्हा फसवणार आहात का? मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर काँग्रेस नेत्याचा सवाल

मुंबई | मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करणारा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारकडे सुपूर्द केला. यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नाना पटोले म्हणाले की, मुंबईसारख्या शहरात सहा दिवसांत २७ लाख लोकांची माहिती गोळा करण्यात आली. या सर्वेक्षणात ५०० पेक्षा अधिक प्रश्न होते. एक-एक अर्ज भरायचा झाला तर त्याला साधारण तास ते दीड तास लागू शकतात. मग सहा दिवसांत २७ लाख लोकांचे सर्वेक्षण कोणत्या आधारावर केले. हे सरकार पुन्हा एकदा मराठा समाजाला खोटे आरक्षण देणार आहे का? मराठा समजाला पुन्हा फसवणार आहात का? असा सवाल केला.

हेही वाचा     –      ‘इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्याचीही चिंता सरकारला नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. याबाबत आम्ही सरकारला हिवाळी अधिवेशनात जाब विचारला होता. मात्र सरकार त्यांची भूमिका मांडायला तयार नाही. जनतेला, तरुणांना, शेतकऱ्यांना फसवण्याचे काम चालू आहे. म्हणून सरकार जे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवत आहे. त्यामध्ये सर्व विधेयकांवर चर्चा झाली पाहिजे. २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव पारित करून घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्या ठरावावर, सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे अधिवेशनातील विधेयकांवर सखोल चर्चा व्हायला हवी, असंही नाना पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button