मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज उच्चस्तरीय सुरक्षा आढाव्यासंदर्भात बैठक
मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल.

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित ठेवला जाईल. येतया दोन ते तीन दिवसात वायुदल, नौदल, लष्कर आणि भारतीय तटरक्षक दल यांच्याशी देखील याबाबत चर्चा होईल, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज एक बैठक पार पडली. उच्चस्तरीय सुरक्षा आढाव्यासंदर्भात ही बैठक झाली. या बैठकीला पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्तांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा – गोशाळेतील जनावरांसाठी स्वतःच्या शेतातील चारा
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात खोट्या बातम्या सोशल मीडियावरून पसरवल्या जातात. हा गंभीर गुन्हा आहे. त्यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा केली आहे. आमची नागरिकांना विनंती आहे. सैन्याकडून जी काही तयारी केली जात आहे, त्याबद्दल कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण करून ते सोशल मिडियावर टाकू नका. सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.