breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी, नेमकं काय घडलं विधानभवनात?

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर दोन्ही गटातील आमदारांविरोधात अपात्रतेची नोटीस बजावली असून कारवाईची मागणी केली आहे. आजपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणीला सुरूवात झाली. यावेळी नेमकं काय घडलं याबाबत शिंदे गटाच्या वकिलांनी माध्यमांना माहिती दिली.

शिंदे गटाचे वकील अनिल सिंह म्हणाले, विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर या प्रकरणांची सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ही सुनावणी केली जात आहे. यावर आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांना एकमेकांना याचिकेशी संबंधित कागदपत्र सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

हेही वाचा – अजित पवार की देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी? सुप्रिया सुळे म्हणाल्या.. 

आज सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे, असं अनिल सिंह म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button