breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के, तर उस्मानाबादमध्ये भूगर्भातील हालचालींनी हादरली घराची छपरं

सातारा |

सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला आज (१ फेब्रुवारी) सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कराड येथील भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाची नोंद ३..३ रिश्टर स्केल तीव्रतेची झाली. कोयनानगर येथील भूकंप मापन केंद्रावर त्याची नोंद २.९ रिश्टर स्केल अशी झाली. पाटण तालुक्यातील हेळगाकपासून नैऋत्येला ६ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. त्याची खोली ५ किलोमीटर अंतरावर राहिली होती. भूकंपाचा हा सौम्य धक्का कोयनानगर परिसरातच जाणवला. अन्यत्र मात्र जाणवला नसल्याचे कराड येथील भुकंपमापन केंद्रप्रमुखांनी म्हटले.

दुसरीकडे उस्मानाबादेत देखील आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी जोरदार आवाज ऐकायला मिळाले. यामुळे घरातील भांडी आणि घराचे पत्रे हादरले. हा आवाज उस्मानाबाद शहर परिसरात आणि कळंब तुळजापूर परिसरात जाणवला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देत माहिती दिली. ते म्हणाले, “हा आवाज भूगर्भातील हालचालीमुळे जाणवला असून हा भूकंप नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button