breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘साली आधी घरवाली’, सासुरवाडीत गेला आणि मेव्हणीलाच पळवून घेऊन आला

औरंगाबाद : ‘साली आधी घरवाली’ अशी म्हण प्रचलित आहे. मात्र, एका जावयाने आपल्या मेव्हणीलाच पळवून नेत पूर्णच घरवाली बनविल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या धोंदलगाव येथे समोर आली आहे. सासरवाडीत आलेल्या जावयाने पत्नीला सोडून अल्पवयीन १७ वर्षीय मेव्हणीलाच पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात जावई व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. उमेश रमेश निगळ असे जावयाचे नाव आहे. तर रमेश शंकर निगळ (रा. कापूसवाडगाव ता.वैजापुर जि. औरंगाबाद.) राजू वाईकर (रा. गणेशनगर ता.संगमनेर, जि.अहमदनगर.) अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धोंदलगाव येथील एका मुलीचे दीड वर्षापूर्वी कापुसवाडगाव येथील युवकाशी लग्न झाले होते. ९ मे रोजी जावई पत्नीसह सासुरवाडी आला. दरम्यान, १७ वर्षीय अल्पवयीन मेहुणीस लग्नाचे आमिष दाखवून सर्वांची नजर चुकवत पळवून नेले. दोघेही अचानकपणे बेपत्ता झाल्याने घरातील मंडळीही काहीशी बुचकळ्यात पडली. गावातली नातेवाईकांमध्ये शोधाशोध घेतल्या नंतरही दोघांचा काही शोध लागला नाही.

दुसऱ्या दिवशी जावयाने सासऱ्याला फोन करून तुमच्या मुलीला पळवून आणल्याचे सांगितले. इतकच नाही तर लग्न करायचे आहे त्यासाठी १० हजार रुपये पाठवा अशी मागणीही जावयाने केली. हा प्रकार समोर आल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलीचे अपहरण केले म्हणून जावई त्याचे वडील आणि मित्र अशा तिघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button